मुंबई/गीता संघर्ष वृत्तसेवा।
राज्यात दि. १७ रोजी बुधवारी सकाळी ११ वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचे गायन होणार आहे. यासाठी नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या "स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गत हे सामूहिक राष्ट्रगीत गायन राबवण्यात आले आहे.
राज्यात दि. १७ रोजी बुधवारी सकाळी ११ वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचे गायन होणार आहे. यासाठी नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या "स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गत हे सामूहिक राष्ट्रगीत गायन राबवण्यात आले आहे.
या सामूहिक उपक्रमात राज्यातील सर्व अबाल वृद्धांनी सहभागी व्हावे आणि नवा विक्रम नोंदवावा असे शिंदे म्हणाले. हा उपक्रम प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती
सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी दिली.राज्यात या उपक्रमाची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव मनू
कुमार श्रीवास्तव यांनी दिली. राज्य शासनाने सामूहिक राष्ट्रगीत गायना या बाबत शासनाकडून सविस्तर निर्णय जारी करण्यात आला आहे. तसेच सांस्कृतीक कार्य मंत्रालयाच्यावतीने यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे.









0 Comments