कुरुंदवाड/गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क।
लेखी आश्वासनात स्मार्ट मीटर सक्ती रद्द करणे, आधी बसवलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवणे, स्मार्ट मीटरमुळे वाढलेली वीज बिले दुरुस्त करणे, शेती पंपासाठी सौर पॅनल सक्ती कायमस्वरूपी रद्द करणे, शेतीपंपाची अश्वशक्तीची अट रद्द करून वीज बिल माफ करणे.
तसेच, जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत स्मार्ट मीटरच्या वीज बिलांची वसुली थांबवण्याचेही लेखी आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले असून, खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशाने जर योग्य निर्णय झाला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना व संघर्ष समितीचे अविनाश गुदले, किरण गावडे, विश्वास बालीघाटे, प्रभाकर बंडगर, वर्धमान भबिरे, योगेश जिवाजे, कार्तिक बलवान, तसेच कुरुंदवाडचे माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर, माजी नगरसेवक उदय डांगे, दीपक पोमाजे, दीपक गायकवाड, ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळ चव्हाण, बापूअण्णा मधाळे, अजित देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



0 Comments