Breaking News
Loading...

Ticker

30/recent/ticker-posts

पीओकेचा वाद मिटण्यासाठी युद्ध हाच पर्याय

राष्ट्रीय/गीता संघर्ष ऑनलाईन डेस्क। 

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अशातच 8 मे रोजी रात्री उशिरा पाकिस्तानने राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, ज्याला भारताने केवळ योग्य उत्तर दिले नाही तर पाकिस्तानच्या अनेक शहरांवरही हल्ला केला. ज्यामुळे शेजारच्या देशाची स्थिती अतिशय बिकट  झाली आहे आणि सध्या तो आपल्या मित्रदेशांना आर्थिक मदत मागत असल्याच्या परिस्थितीत आहे. करण आता भारताचे नौदल, लष्कर आणि हवाई दल हे सर्व शत्रूला धडा शिकवण्यात गुंतलेले आहेत. दरम्यान, भारतीय सैन्याच्या हल्ल्याने बिथरलेल्या पाकड्यांच्या तावडीतून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा आणि ते आपल्या ताब्यात घेण्याची हीच वेळ आहे. असे देशातील सर्व नागरिक एका सुरात म्हणत आहेत. पीओके हा भारताचा एक भाग आहे, ज्यावर पाकिस्तान जबरदस्तीने आपला दावा करत आहे. असा ही सुर सर्वत्र उमटला असताना युद्धाशिवाय पीओके परत घेता येणं शक्य आहे का? 

पीओके बद्दल जाणून घेऊया. पीओके दोन भागात विभागला गेला आहे. त्यातील एक भाग गिलगिट आणि बाल्टिस्तान म्हणून ओळखला जातो. जे 64,817 किमी चौरस क्षेत्रावर पसरलेले आहे.. दुसरा भाग पीओकेचा आहे जो 13,297 किमी चौरस क्षेत्रावर पसरला आहे.जेव्हा देश स्वतंत्र नव्हता तेव्हा जम्मू आणि काश्मीरचा राजा हरि सिंह यांच्या ताब्यात हा भाग होता. जास्त करांमुळे मुस्लिमांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. त्या वेळी, राजा आणि प्रजा यांच्यातील संघर्षाचे एक प्रमुख कारण होते. कालांतराने 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा पाकिस्तानी लोकांना वाटले की काश्मीर त्यांचे आहे.

हेच कारण होते की जेव्हा काश्मीरमध्ये विरोध वाढला आणि अनेकांनी तिथं प्रवेश केला तेव्हा राजा हरि सिंह घाबरले आणि सरदार पटेल यांच्याकडे गेले. सरदार पटेल म्हणाले की, आमच्या सोबत या. आम्ही सैन्य पाठवू आणि पाकिस्तानींना हाकलून लावू. या प्रस्तावानंतर, राजा हरि सिंह यांनी इंस्ट्रूमेंट ऑफ एक्सेशन या करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर भारतीय सैन्याला पाकिस्तानातील लोकांना जम्मू आणि काश्मीरच्या सीमेपार हलवण्यात यश आले. तोपर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू संयुक्त राष्ट्रांमध्ये पोहोचले होते. तिथे एक ठराव मंजूर करण्यात आला, ज्यामध्ये असे म्हटले होते की प्रत्येकाने जिथे आहात तिथेच राहावे. पाकिस्तानने यावर सहमती दर्शवली होती, परंतु भारताने एक अट घातली की जोपर्यंत पाकिस्तानी भारतीय भूमी सोडत नाहीत तोपर्यंत लोकांचे मत घेतले जाणार नाही.

भारत पीओके थेट परत घेऊ शकत नाही. कारण हा एक गुंतागुंतीचा आंतरराष्ट्रीय वाद आहे, जो केवळ बळाच्या जोरावर सोडवता येत नाही. पीओके हा भारताचा अविभाज्य भाग आहे, परंतु पाकिस्तान तो आपल्या नियंत्रणाखाली ठेवतो. पीओके परत मिळवण्यासाठी युद्ध हा एकमेव पर्याय आहे. पण त्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होईल. पीओकेच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र संघ मध्यस्थीची भूमिका बजावते. 

भारत आणि पाकिस्तानमधील हा प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. पीओके पाकिस्तानच्या ताब्यात आहे, त्यामुळे ते परत मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे युद्ध. पाकिस्तानने स्वतः परत केले तरच युद्धाशिवाय पीओके परत मिळवता येईल आणि पाकिस्तान कधीही ते करणार नाही. म्हणून युद्ध हाच एकमेव पर्याय आहे.

Post a Comment

0 Comments

Breaking News
Loading...