सांगली/गीता संघर्ष वृत्तसेवा
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील आटपाडी, करगणी आणि खरसुंडी परिसराला गुरुवारी संध्याकाळी
जोरदार पावसाने झोडपले. करगणीत आठवडा बाजार होता. आठवडा बाजारात व्यापारी व शेतकरी यांनी आणलेला
भाजीपाला व फळे जोरदार पावसाने आलेल्या पाण्यात वाहून गेली. यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जोरदार पावसाने झोडपले. करगणीत आठवडा बाजार होता. आठवडा बाजारात व्यापारी व शेतकरी यांनी आणलेला
भाजीपाला व फळे जोरदार पावसाने आलेल्या पाण्यात वाहून गेली. यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गुरुवारी संध्याकाळी करगणी, खरसुंडी, बनपुरी परिसरात जोरदार पाऊस झाला. करगणीच्या आठवडा बाजारात करगणी परिसरातील गोमेवाडी, बनपुरी, काळेवाडी, तळेवाडी, बाळेवाडी व अन्य वाड्या वस्तीवरील लोक भाजीपाला खरेदी व
विक्रीसाठी आले होते. याच दरम्यान दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने व्यापाऱ्यांसह सर्वांची तारांबळ उडविली. या बाजारात शेतकऱ्यानी व व्यापाऱ्यांनी आणलेला भाजीपाला व फळे पावसाच्या पाण्याने वाहून गेली. करगणी
गावात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसाने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जोरदार पावसाने अनेक ठिकाणची शेती
पाण्याखाली गेली आहे. करगणीचा आठवडी बाजार हा ग्रामपंचायती शेजारी भरतो. बाजार परिसर हा मुख्य
रस्त्यापासून उतारावर असल्याने एस. टी. स्टँड परिसर ते शेटफळे चौकपासून पडणारे पावसाचे पाणी हे बाजाराच्या आवारातून वाहते. वेगाने वाहणाऱ्या पाण्यात बाजारात
आलेल्या सर्वाचे साहित्य वाहून गेले. यामुळे पुन्हा पाऊस आल्यास तारांबळ होवू नये म्हणून प्रशासनाने नियोजन करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.













0 Comments