साखर कारखान्याच्या ऊसतोडीसाठी राज्याच्या विविध भागातून सांगली, सोलापुर, सातारा, बीड, उस्मानाबाद (धाराशिव), नांदेड, लातुर व शेजारील कर्नाटक राज्यातील विजापूर व बेळगावी या भागातून ऊसतोडीसाठी मजुर मोठया प्रमाणात आलेले आहेत. यावर्षीचा साखर हंगाम चालु होत आहे व काही ठिकाणी चालू झालेला आहे. या सर्व मजूरांना आप-आपल्या कारखाना कार्यस्थळावर मुक्कामास ठेवण्यात आलेले आहे. यांचेसाठी मोठया प्रमाणात झोपडया उभ्या केलेल्या आहेत.
मुलांच्या शिक्षणाची खुप मोठी आभाळ होत आहे. त्या ठिकाणी साखर शाळा सुरु करुन त्यांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड थांबवावी. या सर्व मजुरांना आपल्या कुटुंबासह कारखाना कार्यक्षेत्र ऊसाच्या शिवाराच्या ठिकाणी झोपडया मांडून मुक्कामास राहीले आहेत. कारखाना कार्यस्थळावर या ऊसतोड कुटुंबासोबत या मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणेत यावी व जे मजुर ऊसाच्या शिवारात राहीले आहेत अशा मजुरांच्या मुलांना शिक्षणापासुन वंचित न ठेवता कारखाना कार्यस्तळावर साखरशाळेचे नियोजन करून त्या मुलानां नेण्याची-आणण्याची जबाबदारी कारखान्याने करावी.
सध्या उसाची दर जाहीर न झाल्याने आंदोलन चालु आहेत.त्यामुळे कारखाने बंद आहेत. ऊसतोड मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आणि कारखानदारांनी त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करावी. अन्यथा वंचीत बहुजन आघाडीला या सर्व मजुरांसाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल याची नोंद घ्यावी असा इशाराही दिला आहे. या निवेदनावर शिरोळ तालुका उपाध्यक्ष अनिल कांबळे, कुरुंदवाड शहर उपाध्यक्ष अमोल मधाळे, जिल्हा संघटक महावीर कांबळे यांच्या सह्या आहेत




0 Comments